Sunday, April 17, 2011

पहिल्या ३ चक्रांच ध्यान

नमस्कार!

परत बर्याच दिवसांनी भेटतोय!

सांगितलं ना, माझ्या पायाला भिंगरी आहे!

खूप भटकून आले!

पाचगणीला जाउन para - gliding केलं!

४००० फुटावरून खालची जमीन किती सुंदर दिसते!

दर्या, खोरी, शेतं, माणसं अगदी मस्त दिसतं.


आपल्याबरोबर एक प्रशिक्षकही असतो, त्यामुळे घाबरायचं कारण नसतं.

सगळ्यांनी एकदा घ्यावा असा हा अनुभव आहे!


मागच्या पोस्टमध्ये कुंडलिनीच्या ७ चक्रांवरच्या ध्यानाबद्दल बोलणार होतो.

आता सुरु करूया!

खूप इन्टरेस्टिंग असा विषय आहे!

आपल्या भारतीय संस्कृतीत, औषध-उपचारात चक्रांच्या संबंधी भरपूर माहिती असली तरी सामान्य माणूस अजूनही काही सत्यं मान्य करायला कचरतो.

पाश्चात्य विज्ञान अजून डोळ्यांना जे दिसतं, कानांना ऐकू येतं,स्पर्श करता येतो वगैरे ५ इंद्रियांच्या मितीतच बंदिस्त आहे.

पण त्यांनी भरपूर संशोधन केलं आहे व जे उपयोगी सिद्ध होतंय,ते तेवढ्याच वेगात सामान्य लोकांपर्यंत पोचवलंही जात आहे.

यू-ट्यूबवर 'चक्र-मेडीटेशन' वर असंख्य video आहेत!


आज आपण सर्व साधारणपणे डोळ्यांना न दिसणाऱ्या या चक्रांवर कसं ध्यान करायचं ते पाहू.

आधी साती चक्र कुठे आहेत त्या जागा समजून घेऊ.

आपलं सर्वात खालून पहिलं चक्र आहे 'मूलाधार',जे आपलं गुदद्वार आणि आपलं बाह्य जननेन्द्रिय यांच्या
मध्ये असतं.

नावाप्रमाणे ते जणू मुळाला आधार देतं.

पंचमहाभूतांपैकी पृथ्वी हे या चक्राचं तत्व आहे.

याचा रंग लाल आहे.

हे चक्र नीट कार्यरत असणं अत्यंत आवश्यक आहे कारण हेच आपल्याला भक्कमपणे उभं ठेवतं.

याचमुळे आपण पृथ्वीशी जोडलेलो असतो.

आपल्या सर्व प्रकारच्या भीतीचं मूळ या चक्रात असतं.

आपण जर सगळ्या भयगंडान्वर मात केली, तर हे चक्र व्यवस्थित काम करतंय असं समजायला हरकत नाही.

किंवा, दुसरीकडून पाहिल्यास, हे चक्र जेव्हा नीट काम करतं, तेव्हा आपण आपल्या भीतीवर विजय मिळवलेला असतो.

पहिल्या चक्राचं ध्यान कसं करायचं?


एका जागी बसा.

खाली मांडी घालून किंवा खुर्चीवर, फक्त दोन्हीत पाठ ताठ हवी.

खुर्चीवर बसला असाल तर पाय जमिनीला टेकवा.

श्वास शांत होऊ दे.

मग पाठीच्या मणक्याच्या शेवटचं टोक जिथे आहे ती जागा, या चक्राची जागा
मनात आणा.

त्यावर ध्यान लावा.

तिथे एक चक्र आहे त्याचा रंग लाल आहे, त्याला ४ पाकळ्या आहेत
आणि आता ते जसं फिरायला पाहिजे, तसं व्यवस्थित फिरतंय असा मनात विचार करा.

साधारण २ -३ मिनिटं लक्ष केंद्रित असू द्या.


मग पुढील चक्राकडे या.

दुसरं आहे स्वाधिष्ठान.

हे नाभीच्या खाली २ (आडवी!) बोटं असतं.

याचं तत्व आहे जल.

आपलं पैसे व लैंगिकता यासंबंधात जे नातं असतं,
त्याचं मूळ या चक्राच्या नीट फिरण्यावर अवलंबून असतं.

याचा रंग केशरी आहे व याला ६ पाकळ्या आहेत.

मागच्या सारखाच या जागेवर लक्ष केंद्रित करा व २-३ मिनिटं तिथे रहा.



आता येऊ तिसरया चक्राकडे.

हे आहे 'मणिपूर' जे आपल्या नाभीच्या जागी असतं.

याचं तत्व आहे अग्नी.

या चक्राचा संबंध आपल्या भावना व आत्मबळाशी असतो.

हे पिवळ्या रंगाचं आहे आणि याला दहा पाकळ्या आहेत.

मागीलप्रमाणे आता आपल्या नाभिकेंद्रावर ध्यान लावून शांतपणे बसा.


ही तीन चक्र आपल्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत.

आध्यात्मिक प्रगतीचा वेध प्रत्येक मनुष्याला असतो.

त्याने जर आधी ही तीन चक्र व त्यांचे विषय मोकळे केले तर त्याची भक्कम पायाभरणी होऊन प्रगती होईल.

रोज ५ मिनिटं हे ३ चक्रांवरचं ध्यान मनाला मोठ्या प्रमाणात संतुलित करण्यास मदत करेल.

आपण सुरु करा!

पुढील 'पोस्ट'मध्ये पुढची ४ बघू.

No comments:

Post a Comment